*वर्चस्व,सत्ता आणि सत्तेसाठीची विनाशकारी स्पर्धा - डॉ जीतीन वंजारे*

 *वर्चस्व,सत्ता आणि सत्तेसाठीची विनाशकारी स्पर्धा - डॉ जीतीन वंजारे*



         मानवी जीवनामध्ये कुटुंब व्यवस्थेला खूप महत्त्व आहे,कुटुंब व्यवस्थेतून समाजाची निर्मिती झाली समाजामधून वाड्या, वस्त्या, पाढे तयार झाले या सर्वांच्या एकसंध्येतून गाव आणि शहरांचा विकास झाला आणि त्यामध्ये कुटुंबप्रमुख कोण ? सत्ताधारी कोण? गावाचा, शहराचा मुख्य व्यक्ती कोण अशी स्पर्धा चालू झाली आणि त्यातूनच सत्तावादाचे कारस्थान पुढे आले. आणी त्यात प्रामुख्याने एक गोष्ट म्हणजे ही सत्ता वर्षानुवर्ष फक्त आणि फक्त श्रीमंत, जमीनदार,मनगटात बळ असणारे लोक किंवा ज्यांची कुटुंब मोठी आहेत,एकत्रित आहेत अशाच लोकांनी या सत्तेचा उपभोग घेतला एकाधीकार शाही त्यांनी गाजवली आणी वर्षानुवर्ष आपला प्रतिस्पर्धी तयारच होऊ दिला नाही.परिणामी फक्त निवडणूकीपुरत काम करायचं पैसे वाटायचे सत्तेत यायचं आणि पाच वर्ष फक्त स्वताचीच घर भरायची अशी जणू सवयच लावली.परंतु समाजातील तरुणांनी समोर येऊन सर्वसमावेशक काम करून स्वतातले राजकीयगुण विकसित करुन सत्तांतर आणि सत्ता बदल करायला हवे.फक्त युवा तरुणांच्या मनात मोठमोठी प्रलोभने देऊन जस चहा विकणाऱ्या मोदी पासून ते सरकार विकत घेणाऱ्या आदानी, अंबानी पर्यंत सत्तांचं हस्तांतरण कसं झालं, कोण कोणत्या क्लुप्त्या वापरल्या गेल्या,सत्ता बदलासाठी सामाजिक परिवर्तन कशा पद्धतीने करायचं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला हवा. काँग्रेस च्या एकाधिकारशाही मुळे लोकं चिंतेत होते लोकांना योग्य पर्याय नव्हता त्यामुळे बिजेपि सत्तेत आली अश्या राजकीय बदलांकडे लक्ष देऊन आपणही गावोगावी सत्तांतर करण गरजेचे आहे.आज 21 व्या शतकामध्ये लोकशाही अबाधित असणारी फार थोडी देश आहेत त्यापैकी स्वतंत्र लोकशाही असणारा भारत हा मोठा देश आहे यामध्ये जनतेतून लोक निवडले जातात आणि त्याची सुरूवात ग्राम पंचायत पासून होते परंतु लोकशाहीच्या खऱ्या पटलावर सांगितल्याप्रमाणे अगदी तंतोतंत तशीच लोक पुढे येतात का? समाजनिष्ठ राजकारण विरहित विकासात्मक दृष्टिकोनातून लोकांच्या निवडी केल्या जातात का? चला तर मग आपण आज लोकशाहीच्या सर्वात मोठा उस्तव म्हणजे निवडणूक याविषयी आढावा घेऊयात.लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकांकडून लोकांसाठी लोकांच्या हितासाठी राज्य हाकण्यासाठी विशिष्ट व्यक्तींची निवड केली जाते परंतु ती निवड योग्य होते का ? त्या निवडीमध्ये धन दांडग्यांनाच प्राधान्य का दिले जाते ? याविषयी सविस्तर पाहूया.

            आता निवडणूक म्हटलं की घरातील व्यक्ती, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र गण या सगळ्यांच्या जिथे जिथे कोणाच्या चाव्या असतील त्या फिरवल्या जातात आणि ती ती माणसं स्वतःकडे वळवली जातात लोकशाहीच्या या अगदी स्वतंत्र अशा निवड प्रक्रियेमध्ये सुद्धा कोणाची तरी मक्तेदारी,कोणाची तरी प्रलोभने, कोणाचातरी दबाव किंवा कोणत्याच प्रक्रिया मान्य न झाल्यास साम-दाम-दंड-भेद वापरून शेवटी अर्थकारण याच गोष्टी पाहिल्या जातात त्यामुळे देशाच्या एकंदरीत व्यवस्थेमधून असं लक्षात येतं की सत्ता एवढ्या वर्ष त्याच-त्याच घराण्याकडे फिरत आहे सत्तांतर होताना दिसत नाहीये आणि म्हणून ही समाज व्यवस्था बदलणं गरजेचं आहे. दारू, मटण, पैसा हे सर्रास चालत आणि ते सगळेच देतात घेतात यात वावघ काही नाही  ते त्यांनीही असच लुटलेल, ओरबडलेल धन जमा करून तुम्हाला देत आहेत ते घ्या, खा, प्या पण योग्य व्यक्तीची निवड करा. गाव कोणाच्या हातात सोपावताना हजार वेळा विचार करा,बदल घडवा, सर्वांना चांस द्या प्रत्येकीची कार्यप्रणाली वेगळी असू शकते संकल्पना वेगळ्या असू शकतात त्याना बळ द्या अन् विकासाला शोधून काढा. आता नौकरी, व्यवसाय या गोष्टी सोडा आता मूलभूत गरजांसाठी गावच्या राजकारणाकडे लक्ष द्यायला शिका, कामाचा माणूस हक्काचा मानुस आणि सर्वसमावेशक मानुस शोधून त्याला साथ द्या.त्यासाठी निवडणुकीमध्ये शिक्षणाची अट असणे गरजेचे आहे, निवडणूक लढणाऱ्या व्यक्तींच्या काळ्याधनाची चौकशी करणे गरजेचे आहे. निवडणुकीला आलेल्या खर्चाचं तंतोतंत मूल्यांकन करणे गरजेचे आहे ती जाहीर केलेली संपत्ती आणि सत्ता काळामध्ये पाच वर्षांमध्ये त्याच्या संपत्तीत झालेल्या बदलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पैसा आला कोठून? हे विचारा. कारण एखाद्या गावातील सामान्य असणारा सरपंच पदाचा उमेदवार पाच वर्षे सत्ता भोगतो आणि पाच वर्षानंतर तो करोडपती झालेला असतो मग पाच वर्षांपूर्वी त्याने इलेक्शन कमिशन ला दिलेल्या संपत्तीच्या अहवालामध्ये पाच वर्षांमध्ये इतकी भरभराटी होतेच कशी या सर्व गोष्टींची काळजीपूर्वक तपासणी केल्यास तंतोतंत विकास झाल्याशिवाय राहणार नाही परंतु आपल्या देशामध्ये दारू, गांजा,चरस, गुटखा, सिगारेट ज्या वस्तूंमुळे जीवितास हानी असते अशा वस्तूंची कारखाने मुक्तपणे परवानगी देऊन चालू करतात आणि व्यसनमुक्ती दारूबंदी किंवा तस्तम नशेरी पदार्थावर बंदी असे निष्फळ उपाय योजले जातात म्हणजे त्या गोष्टीला खतपाणी आपणच घालायचं आणि परत त्याचा उहापोह आपणच करायचा ही गोष्ट अगदी चुकीची वाटते.

             सत्ते पुढे शहाणपण चालत नाही असं म्हणून चालणार नाही सत्ता बदलासाठी सत्तेच्या विरोधात,सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात जाहीर बंड पुकारण्याची हिंमत जोपर्यंत आपल्या सर्वांच्या अंगी येत नाही तोपर्यंत आपण खऱ्या विकासाला पाहणार नाहीत. त्यामुळे भारताचा सुजाण नागरिक या नात्याने आपण चौकसपणे निवड प्रक्रियेकडे लक्ष दिले पाहिजे निवडणुका सर्रासपणे पैशाचा जोरावर चालतात पैसा हा निवड प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक मानला जातो आणि चंद पैशाच्या मोहा मध्ये आपण आपल्या मूलभूत आणि अधिकारीत असणाऱ्या गोष्टींच्या विरोधात जातो ही गोष्ट विचार करण्यात आली आहे. सत्ता आपल्याकडे आणण्यासाठी निवडणुकीमध्ये लाखो रुपये खर्च केले जातात मग ते खर्च केलेले पैसे परत काढण्यासाठी आणि त्याच्या दुप्पट तिप्पट परत पैसा कमवण्यासाठीच सत्ताधिकार्‍यांच्या स्पर्धा चालू होतात आणि त्यातून गावचा विकास तसाच राहून जातो. म्हणजे निवडणूक म्हणजे जुगार आहे की काय ? अशाच पद्धतीच्या चर्चा आज काल गावागावांमध्ये होताना दिसतात कारण पडलेल्या सरपंचापदाच्या उमेदवाराच्या घरी लोक खूप खर्च झाला म्हणून त्याचे सात्वन करण्यासाठी येतात त्यातील फार थोडी लोक परत लढा ! सामाजिक कार्य करा ! लोकांची मदत करा ! आणि सत्तेत या असा सबुरीचा सल्लाही देतात कारण सत्ता म्हटलं की पैसा खर्च करणे आलंच आणि पैसा खर्च करायला लावणारी मंडळी म्हणजे तुम्ही आम्ही च बाकी दुसरे कोणी नाही. त्यांना पैसा वाटायला आणि घ्यायला पण आपणच जबाबदार आपण योग्य वेळी त्यांचे कान टोचून जबाबदारीने त्यांना आपले सेवक किंवा गावाचे सांगेल ते काम करणारे कर्मचारी असं म्हणून पाहिले तर आणि तरच आपण लोकशाहीला अपेक्षित असणारे निवड प्रक्रियेतील विकासात्मक हिरे शोधू शकतो.आणि हे सर्वांसाठी लागू आहे निवडणूक कोणतीही असो आपले सेवक किंवा कर्मचारी म्हणून त्यांना निवडून देतो हे लक्षात असल पाहिजे  जेणेकरून शासनाच्या प्रत्येक योजना तंतोतंत पालन करून त्या योग्य रीतीने राबवून सत्ता परिवर्तन करू शकतो आणि स्वतःसह गावाचा विकास करू शकतो.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.