कोरोना काळात घरात दडुन बसणाऱ्यांना आता मतदाराच घरी बसवणार :आ. सुरेश धस
आष्टी: प्रतिनिधी
मागील दोन वर्षांपूर्वी सर्वत्र कोरोनाने हाहाकार केला होता. त्यावेळी माणूस माणसाला भेटतही नव्हता किंवा जवळही येऊ देत नव्हता. मात्र या काळात आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक रुग्णाला आधार देण्याचे काम केले. कड्यातील अनिल तात्या ढोबळे युवराज पाटील यांच्यासह आमच्या सर्व टीमने रुग्णांना आधार देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. मी स्वतः अनेक कोविड सेंटर चालवुन अनेकांना जीवदान देण्याचं काम केलं. मात्र आता कडा शहरात पदासाठी मते मागणारे कोरोना काळात कुठे होते? कोरोना काळात घरात दडुन बसणाऱ्यांना आता मतदारच घरी बसवणार असल्याचा विश्वास आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला. ते कडा येथे धवल क्रांती विकास पॅनलच्या प्रचार सांगता समारोप प्रसंगी बोलत होते.तत्पुर्वी यावेळी सरपंच पदाच्या उमेदवार लताबाई पाटील या पाटील घराण्यातील असून त्यांच्या व सदस्य पदासाठीच्या सर्व उमेदवार विजयासाठी सांगता समारोपप्रसंगी रॅली काढण्यात आली त्या रॅलीमध्ये अख्ख गाव एकवटल्याचं चित्र दिसून आले.
धवलक्रांती विकास पॅनलच्या प्रचाराची सांगता श्रीराम पेठेतील सभेमध्ये झाली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोरख तात्या कर्डिले हे होते तर व्यासपीठावर माजी सरपंच दीपमाला ढोबळे, संदीप खाकाळ राजाबापू कर्डीले, सरपंच पदाचे उमेदवार लताबाई ढोबळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार धस म्हणाले की, कडा शहराची झपाट्याने वाढ होत असून आष्टी शहरासारखेच विकसित गाव होऊ लागले आहे आता तर रेल्वे आल्याने विकासामध्ये आणखी भर पडणार आहे त्यासाठी योग्य उमेदवार निवडून देण्याची गरज आहे कडा कृषी उत्पन्न बाजार समिती ज्यावेळी माझ्या ताब्यात आली त्यावेळी बाजार समिती आवारात एक पोत्याचे हॉटेल व दोन व्यापारी होते त्यानंतर हळूहळू बदल करत व्यापाऱ्यांना विनंती करून या ठिकाणी व्यापारास चालना देण्याचे काम केले आज कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा परदेशात जात असून यामुळे कडा शहराची मान राज्यांमध्ये नव्हे तर देशात आणि परदेशातही उंचावली आहे कडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आसपासच्या चार जिल्ह्यामधून कांदा विक्रीसाठी येत आहे त्यामुळे बाजारपेठ विकसित करण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत कडा शहराला आता नव्याने मेहकरी धरणातून साडेतेरा कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली असून या योजनेची निविदाही निघाली आहे त्याचे काम लवकरच पूर्ण होऊन जलशुद्धीकरण प्रकल्पासह प्रत्येक नागरिकाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणार आहे ही योजना केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून होत असून 2024 पूर्वी योजना पूर्ण झालीच पाहिजे असे केंद्राचे आदेश आहेत कडा शहरांमध्ये विरोधकांनी कोणती कामे केली हे एकदा जाहीर सांगावे त्यानंतर त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे घरकुला संदर्भात टप्प्याटप्प्याने घरकुले येणार असून वस्ती रस्ते हे पानंद रस्ते योजना यामधून पूर्ण करणार आहे तसेच गावातील सिमेंट रस्ते हे जवळपास पूर्ण झाले आहेत उर्वरित रस्ते पुढील काळात पूर्ण करण्यात येण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कड्याची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून येथील लोकांची नगरपंचायत करण्याची मागणी आहे मात्र त्यासाठी थोडं थांबावं लागणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले.यावेळी माजी सरपंच अनिल तात्या ढोबळे यांनी पाच वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांची माहिती दिली. युवराज पाटील म्हणाले की, येत्या दोन वर्षात टँकर मुक्त कडा करणारा असून सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मुबलक प्रमाणात देण्यात येईल तसेच एक वर्षात कडा गावामध्ये एकही उघडी नाली दिसणार नसून स्वच्छ सुंदर कडा शहर करण्यासाठी धवल क्रांती विकास पॅनलला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी संदीप खाकाळ, रमजान तांबोळी हेमंत पोखरणा प्रा. दीपमाला ढोबळे यांची भाषणे झाली.
यावेळी हेमंत पोखरणा, संजय मेहेर,डॉ.महेंद्र पटवा,सुभाष कर्डीले, दीपक कर्डीले,.राम मधुरकर,संजय ढोबळे, बाळासाहेब कर्डीले, सागर खेडकर, सेवा सोसायटीचे चेअरमन उद्धव कर्डिले, किशोर पाटील ,राजा बापू कर्डिले ,संपत कर्डिले, सुनील देशमुख, राहुल धुमाळ ,बिपिन भंडारी, शिवराज पाटील ,श्याम कर्डिले ,हनुमंत परदेशी ,बालु कर्डिले ,अमोल कर्डिले ,शिवाजी कर्डिले, सचिन घावटे ,सुरेश खेडकर ,धनंजय मुथा, प्रकाश खेडकर ,सुभाष घावटे , राम ससाने ,दीपक सोनवणे ,संतोष मेहत्रे, , दत्ता होळकर ,राजू साळवे महेश घोलप ,गोविंद मिश्रा, सुभाष ढोबळे, प्रवीण बहिर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपत सांगळे यांनी केले
stay connected