टाकळी सप्टेशन कडा शहरातील लाईनला जोडा अन्यथा उपोषण - सरपंच सावता ससाणे
ऐन उन्हाळ्यात गावे चाचपडतेत अंधारात
कडा (प्रतिनिधी ) अनिल मोरे
महावितरण कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे तालुक्यातील टाकळी अमिया सप्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकरी नागरीक त्रस्त झाले आहेत.विजेचा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतक-यांना भरणे व पाण्यासाठी पाणी असून विजे अभावी भटकंती करावी लागत टाकळी अमिया सप्टेशन जुन्या लाईनला जोडले असल्याने याच लाईनवर अतिरिक्त लोड असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होऊन नागरीकांना प्रचंड त्रास होत आहे.ऐन उन्हाळ्यात नागरीक अंधारात चाचपडत आहेत.तात्काळ टाकळी अमिया सप्टेशन कडा लाईन वरती जोडावे अन्यथा उपोषणाचा इशारा सरपंच सावता ससाणे,उपसरपंच विष्णू निंबाळकर यांनी दिला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत.वीज वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. एकूणच, सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा गंभीर मुद्द्याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिक व व्यावसायिकांना त्रासास सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने ही समस्या सोडवणे गरजेचे आहे.आष्टी ते कडा जुनी लाईन १९७० सालची असून पोल जीर्ण झाले आहेत.वारंवार विद्युत तारा तुटण्याच्या घटना घडत आहेत.याच लाईनवर टाकळी अमिया,वाहिरा,धानोरा,पिंपळा हे ४ सप्टेशन असून नवीन लाईन वरती फक्त कडा सप्टेशन आहे.टाकळी अमिया सप्टीशन वरती चोभानिमगांव,टाकळी अमिया,रुई - नालकोल,आनंदवाडी-सराटेवडगांव,हे गावे असून लोडमुळे विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तात्काळ टाकळी अमिया सप्टेशन कडा लाईनवर जोडावी अन्यथा उपोषणाचा इशारा सरपंच सावता ससाणे,उपसरपंच विष्णू निंबाळकर यांनी दिला आहे.
stay connected