पंकजाताई आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकास निधीचे योग्य नियोजन केल्यानेच तीनही नगरपंचायतवर भाजपाचा झेंडा फडकला
आष्टी (प्रतिनिधी)
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिलेल्या भरघोस विकास निधीमुळे आष्टी,पाटोदा, शिरूर का नगरपंचायतीच्या विकास कामांचे सुयोग्य नियोजन करता आले त्यामुळेच मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला असून आष्टी,पाटोदा आणि शिरूर या नगरपंचायतवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे. असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले. आष्टी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आष्टी,पाटोदा आणि शिरूर नगरपंचायतींना रस्ते बांधकाम घनकचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा या कामांसाठी भरघोस निधी दिला होता तसेच प्रधानमंत्री आवास योजने मध्ये आष्टी,पाटोदा, आणि शिरूर नगरपंचायतीने महाराष्ट्र राज्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे. गोरगरिबांच्या हक्काचे घराचे छत मिळवून दिल्यामुळे मतदार राजाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी केले आहे .आष्टी नगरपंचायतमध्ये भाजपाच्या कमळ चिन्ह वरील दहा आणि चार अपक्ष पाटोदा येथे भाजपाच्या कमळ चिन्ह वरील नऊ आणि सहा पक्ष तसेच शिरूर येथे भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्ह वरील अकरा असे 51 पैकी 40 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. दोन ते तीन ठिकाणी अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सत्ताधारी आणि राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना तीन अंकी संख्या ही पार करता आलेली नाही ते दोन अंकातच मर्यादित राहिले आहेत ही विशेष बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
आष्टी,पाटोदा,शिरूर या तीनही ठिकाणी भाजपा विरोधामध्ये महाविकास आघाडीचे शासनातील अनेक मंत्री आणण्यात आले परंतु त्यांनी व्यक्तिगत खालच्या पातळीवर केलेल्या टीका टिप्पणीमुळे मतदारांनी त्यांना झिडकारले चे दिसून येत आहे. आष्टी,पाटोदा, शिरूर येथे पंकजाताई मुंडे याच आमच्या एकमेव नेते होत्या त्यांचे बरोबर माजी आमदार भीमराव धोंडे यांनीही भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. हे घवघवीत यश हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या एकीचे फलित आहे असेही ते म्हणाले मागील पाच वर्षांमध्ये अनेक विकास कामे झाले आहेत परंतु जी शिल्लक आहेत ती कामे यापुढे प्राधान्याने सोडण्यात येतील त्यामध्ये सर्व पात्र लाभार्थींना घरकुले दर्जेदार रस्ते क्रीडांगण उद्यान आणि व्यवसायिकांना व्यापारी गाळे उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
गोरगरीब जनतेमध्ये सतत संपर्कात असलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे आमचे सर्वात मोठे मोठे भांडवल असून दैनंदिन अडीअडचणी आणि आपत्ती काळामध्ये जनतेबरोबर राहायचे आमचे धोरण असल्यामुळे तीनही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत असेही ते शेवटी म्हणाले.
stay connected