कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना विवीध सवलती मिळाव्यात - कृषीरत्न बाबासाहेब पिसोरेंची मागणी
महाराष्ट्र राज्यातील प्रगतशिल प्रयोगशील पुरस्कार प्राप्त शेतकरी विविध भागातील शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यात फिरत असतात. यासाठी त्यांना खर्चही येतो. स्वतः ही झळ सोसत ते हे काम निस्वार्थ पणे करतात . शासनाने या बाबींचा विचार करून त्यांना एस.टी. मोफत, टोल मोफत, शासकीय विश्राम गृह प्राधान्याने सवलतीच्या दरात उपलब्ध करुन द्यावे तसेच मंत्रालयात प्रवेश देणे महत्वाचे आहे अशा मागण्या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात विवीध कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांकडून करण्यात आल्याची माहिती कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषीरत्न पुरस्कार प्राप्त कृषीभूषण बाबासाहेब पिसोरे यांनी दिली.
मुंबईत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील कृषी चे विविध पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यानिमित्ताने शासनाकडे मागण्या केल्या आहेत. तसेच मानधन वाढवून द्यावे. शिक्षण विभागामार्फत शिक्षकांना 'आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. पुरस्कारासोबत त्यांना एक वेतन वाढ दिली जाते. त्यांना शासनाचा पगार राहतो. तरी सुध्दा त्यांना एक वेतन वाढ देऊन त्यांना आर्थिक फायदा केला जातो. त्या सारखेच पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना मानधन दिल्यावर योग्य राहील. महाराष्ट्र राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना विशेष ओळखपत्र देऊन त्या ओळखपत्रव्दारे त्यांच्या वाहनास टोल माफी, एस टी, बस मोफत प्रवास योजना, शासकीय विश्राम ग्रह प्रधान्याने सवलतीच्या दराते उपलब्ध करून देणे मंत्रालयात शासनाचा इतर विभागाचा (उदा. समाज कल्याण) पुरस्स्कार विद्यार्थ्यांना एस.टी चा मोफत पास दिला जातो पण पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना दिला जात नाही. वास्तविक पुरस्कार प्राप्त शेतकरी शासनाच्या विस्तार कामासाठी तसेच वेगवेगळ्या कृषी विद्यापिठाला, कृषी संशोधन केंद्रात, कृषी प्रदर्शन अभ्यास दौरा करीता राज्यभर फिरत असतात. त्याकरीता पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना एस.टी. मोफत, टोल मोफत, शासकीय विश्राम गृह प्राधान्याने सवलतच्या दरात उपलब्ध व्हावे, मंत्रालयात प्रवेश देणे महत्वाचे आहे. याकरीता शासन निर्णय घेऊन शासकीय ओळखपत्र द्यावे असा शासन निर्णय करावा. असेही बाबासाहेब पिसोरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना कृषी क्षेत्रातील सर्वोच्च असा कृषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे . त्यांना मिळालेल्या या सन्मानामुळे बीड जिल्हाभरातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .
stay connected