*पोलीस ठाणे आष्टी तर्फे सर्व नागरिकांना आव्हान*
पोलीस ठाणे आष्टी तर्फे सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, सध्याच्या काळात चोरी व घरफोडीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले असल्याने आपण आपल्याकडील सर्व मौल्यवान वस्तू, सोन्याचांदीचे दागदागिने तसेच रोख रक्कम स्वतःच्या जवळ न ठेवता बँकेत सुरक्षित ठेवावी ,
तसेच सध्या गावात व शेतात वस्तीवर राहणारे शेतकरी ज्वारी व रब्बीचे पिके काढण्यासाठी घराला लॉक लावून शेतात जातात त्यामुळे दिवसाही चोऱ्या होतात, म्हणून पिके काढण्यासाठी घरातील सर्व व्यक्तीं न जाता घरातील एक व्यक्ति आपल्या घरी ठेवावी जेणेकरून आपल्या घराचे व मालमत्तेचे रक्षण होईल आणि चोरी व घरफोडीचे प्रकार होणार नाहीत
वरील सूचनांचे पालन करून आपल्या मालमत्तेचे रक्षण करावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे *सलीम चाऊस*
*पोलीस निरीक्षक*
*पोलीस ठाणे आष्टी*
stay connected