पर्यावरण वाचवा
शालु हिरवा होता पांघरलेला,
ह्या वसुंधरेच्या अंगावरती,
सिमेंट काॅंक्रेट वाल्यांनी,
अशी नांगरली ही धरती ||१||
निसर्गावर होती मानवाची,
एकेकाळी जिवापाड माया,
रस्ते ,सिमेंट ,काॅंक्रेटीकरण,
शहरीकरणा,मुळे गेली वाया ||२||
अशा गर्द हिरव्या जंगलात,
झाडं तोडुन,प्राणी मारुन,
स्वतःच्या स्वार्थापायी,
घेती पोटाचे खळगे भरुन ||३||
ह्या घनदाट जंगलामधी,
गात असे मंजुळ गाणी,
येत असे आवाज पक्ष्यांचा,
वाहत होते खळखळ पाणी ||४||
झाडे तोडली,वृक्ष मारली,
पर्यावरणाचा नाश केला,
श्वास घेण्यास माणसा ,
आता प्राणवायु नाही उरला ||५||
पाणी आडवा, पाणी जिरवा,
विचार पुढचा नवी संकल्पना,
नका करू पाण्याची नासाडी,
आता विचार अंमलात आणा ||६||
कवी प्रविण खोलंबे.
ता, मुरबाड ,जि.ठाणे.
मो.८३२९१६४९६१
stay connected